सोमवार, ८ डिसेंबर, २०१४
सोमवार, १ डिसेंबर, २०१४
मंगळवार, २८ ऑक्टोबर, २०१४
..................मन:पूर्वक अभिनंदन ............
कल्याण महापालिकेतील, लाचखोरीच्या आरोपासाठी निलंबित असलेल्या लाचखोर अधिकाऱ्याला पुन्हा कामावर रुजू करून घेण्यात येत आहे.
****आमच्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सर्व वरिष्ठ अधिकारी
****रुजू करून घेण्यासाठी प्रयत्न केलेल्या नगरसेवक
****ह्या निर्णयाविरोधात तोंड न उघडता मुग गिळून बसलेल्या सर्व नगरसेवक
****महापालिका क्षेत्रातून निवडून आलेले पण ह्या निर्णयाविरोधात तोंड न उघडलेल्या सर्व खासदार, आमदार
या ज्ञात आणि अज्ञात सर्व मान्यवरांचे ***
या ज्ञात आणि अज्ञात सर्व मान्यवरांचे ***
****आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील माझ्या सकट सर्व नागरीकांचे देखील ....
..................मन:पूर्वक अभिनंदन .............
माझ्या डोळ्यासमोर चित्र उभं राहिलंय ..........
सगळे लाचखोरीचे आरोप असलेले अधिकारी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर उभे आहेत ...........विजयी वीरांच्या थाटात त्यांना ओवाळलं जातंय..............तुतारी, ढोल ताशे अशा पारंपारिक वाद्यांच्या गजरात हे अधिकारी आपापल्या दालनांकडे रवाना होताहेत ..............एरवी भकास दिसणारी महापालिका फुलांनी सजवलीये ..........त्यांच्या वाटेत फुलं उधळली जाताहेत ........महापालिकेतील वरिष्ठ अधिकारी एकेका लाचखोराला हाताला धारून त्याच्या त्याच्या खुर्चीवर बसवताहेत ............अहाहा ...........
"काय वर्णावा तो सोहळा"
बहुतेक .........अच्छे दिन आ गये
गुरुवार, १६ ऑक्टोबर, २०१४
सोमवार, ४ ऑगस्ट, २०१४
रविवार, ६ जुलै, २०१४
" Priorities "
एखादया व्यक्तीसाठी किंवा कामासाठी "वेळच" मिळत नाही असं जेव्हा कोणी म्हणतं तेव्हा खरा प्रश्न "Priorities" चा असतो. समोरच्याला वाईट वाटायला नको म्हणून आपण वेळेचं कारण पुढे करत असतो.
तसं नसतं तर ज्यासाठी एकाला वेळ मिळतो त्यासाठी दुसऱ्याला वेळ कसा नसतो ? समजुन उमजुन किंवा नकळत आपण प्रत्येक गोष्टीसाठी किंवा व्यक्तीसाठी आपल्या डोक्यात "सेट" असलेल्या " Priorities " प्रमाणेच निर्णय घेत असतो.
शनिवार, ३ मे, २०१४
अबू आजमी आणि दिग्बिजय सिंग
कुठे तरी बोलताना अबू आजमी म्हणाले " जे मुस्लिम समाजवादी पक्षाला मतदान करत नाहीत, ते खरे मुस्लिम नाहीत "........................हे असले अकलेचे तारे तोडून अबू आजमी सारखे नेते त्या समाजाचं जेवढं नुकसान करतात तेवढं त्या समाजाच्या कट्टर विरोधक असलेल्या संघटना मनात आणूनही करू शकत नाहीत.
कॉंग्रेसचे दिग्बिजय सिंग आणि समाजवादी पक्षाचे अबू आजमी एकाच शाळेत शिकलेले असणार. त्याशिवाय दोघांनाही इतकी पराकोटीची बेताल वक्तव्य सातत्याने करत राहणं शक्यच नाही.
रविवार, २७ एप्रिल, २०१४
ए आयटम ....
ठाणा स्टेशनला दोन नं. Platform वर कल्याणला जाण्यासाठी लोकलची वाट बघत उभा होतो. समोर तीन नं platform वरुन कर्जतला जाणारी गाडी नुकतीच निघत होती.
दोन आणि तीन नं track च्या मधे एक साधारण 18/19 वर्षांची भंगार वेचणारी मुलगी प्लास्टिक आणि पत्र्याचे टीन शोधत होती. इतक्यात नुकत्याच सुटलेल्या गाडीतील एक टोळकं तिला "ए आयटम" ......"ए छावी "म्हणुन हाका मारू लागलं. तिने मागचा पुढचा विचार न करता एक दगड उचलला .......जीव खाऊन तो त्या टोळक्याच्या दिशेने भिरकावला...... दगड एकाच्या पायावर perfect बसला. ते कार्ट कळवळून गाडीतच धडपडलं.
ती मुलगी शांतपणे पुन्हा तिच्या कामाला लागली. जणू काही झालंच नाही.
मला समजत नाहीये की मी तिच्या बेडर पणाला सलाम करू की हे सगळ होत असताना गर्दीचा हिस्सा बनुन बघत राहिलो त्याची शरम बाळगु ?
मंगळवार, १५ एप्रिल, २०१४
AM-PM 24 Hrs Hospital …………इस्पितळ ? हॉटेल ? की दुकान ?
AM-PM 24 Hrs Hospital (बैल बाजार ) …………इस्पितळ ? हॉटेल ? की दुकान ? काहीच नाही निव्वळ अनास्था – निष्काळजीपणा – आणि पेशंटच्या जीवाशी खेळ
सासऱ्यांना पायाला छोटीशी जखम झाली, सासरे मधुमेही, शंका नको म्हणून नेहेमीच्या डॉक्टरांकडे नेलं, डॉक्टरांनी जोखीम नको म्हणून सर्जनला दाखवून सल्ला घ्यायला सांगितलं. जवळच्याच ( बैल बाजार कल्याण पश्चिम ) “AM-PM 24 Hrs” Hospital मध्ये आवश्यक सोय असून तिथे उपचार करून घ्यायला सुचवलं.
ज्यां डॉक्टरांनी सुचवलं त्यांच्याशी गेली २० वर्षं कौटुंबिक संबंध आहेत. आम्ही शनिवारी संध्याकाळी “AM-PM 24 Hrs Hospital” हॉस्पिटल गाठलं तिथल्या डॉक्टरांनी तपासलं आणि लगेच हॉस्पिटल मध्ये दाखल करून घ्यायला सांगितलं. आम्ही लगेच तयारी चालू केली आणि त्या क्षणापासून प्रत्येक क्षणी डोकं आपटून घ्यावसं वाटायला लागलं.
हॉस्पिटल मध्ये दाखल करून घ्यायचा निर्णय झाल्या क्षणी तिथल्या ऑफिस मधला एक कोटवाला हातात “टेरिफ कार्ड “ फडकावत आला, फटाफट उपलब्ध असलेले डिलक्स , स्पेशल आणि जनरल “wards” दाखवले. स्पेशल रुमचं महत्त्व तीन तीनदा सांगूनही आम्ही बधलो नाही मग अनिच्छेने आमच्या सासऱ्यांसाठी पुरुषांच्या जनरल एसी ward मध्ये बेड तयार झाला. मग ८ ते ११ म्हणजे साधाराण ३ तास ताटकळत ठेवल्यावर आम्हाला बेड चा ताबा मिळाला( एवढ्या वेळात सरकारी हॉस्पिटल मध्ये पण ६ वेळा Admit झाले असते सासरे). त्या दरम्यान X Ray काढायचा होता पण Technician उपलब्ध नव्हता, त्यात अर्धा पाउण तास गेला. एकूणच ह्या ह्या तीन तासात धड कोणाकडे कसली उत्तरंच नव्हती.
दुसऱ्या दिवशी सकाळी सलाईन बदलायला एक भगिनी ( sister ) आली काही तरी गडबड झाली आणि सासऱ्यांचं बरंच रक्त फरशीवर सांडलं. “भगिनी” ची चूक झाली, दुर्लक्ष झालं की सासऱ्यांच्या रक्ताची चूक झाली ते काही कळालं नाही. सासूबाईनी जाऊन सांगितल्यावर रक्त पुसून घेतलं गेलं
१२ वाजता होणार असलेल्या सर्जरीसाठी १ वाजता त्यांना नेलं पण ज्या ऑपरेशन थिएटर मध्ये सर्जरी होणार होती तिथे टेबल पूर्ण उघडलं की डॉक्टरना जागा उरत नव्हती आणि नाही उघडलं तर सासरे मावत नव्हते. शेवटी छिन्नी हातोडी घेऊन माणूस बोलावला गेला. काही तोडफोड ( अर्थातच भिंतीची ) करून पाउण तासाने एकदाची सर्जरी चालू झाली.
सासरे सुखरूप बाहेर आले. डॉक्टरांनी थोड्या वेळाने येऊन रक्तदाब आणि “शुगर” तपासली आणि “All is well” सांगून लगेच काहीही खायला न देण्यासंबंधी बजावून डॉक्टर गेले. ५ मिनिटात एक “Lab” मधली भगिनी ( sister ) आली आणि सासूबाईना सांगितलं त्यांना जेवायला द्या आता आणि काही त्रास झाला तर मला सांगा. मी उडालोच तिला विचारलं “तुम्ही डॉक्टर आहात का ?” म्हणे “नाही” मी सांगितलं “माझे सासरे “कट्टर मधुमेही” आहेत आणि डॉक्टरांनी अजून किमान ३/४ तास खायला देऊ नका असं सांगितलंय “ओह असं का .....एवढं बोलून भगिनी चालू पडल्या. मग मात्र माझं डोकंच सणकलं. माझा आवाज चढल्यावर पळापळ झाली थोड्या वेळाने डॉक्टर आले त्यांना आदल्या दिवशी पासूनची कर्मकथा सांगितली त्यांनी त्यांचा मोबाईल नंबर दिला आणि काहीही त्रास असेल तर ताबडतोब फोन करायला सांगितलं.
दाखल केल्याचा तिसरा दिवस म्हणजे सोमवार कसा बसा काचेतून येणाऱ्या उन्हाच्या झळा सोसत पार पडला ( एसी Ward चे पैसे लागतील पण एकाच पेशंट साठी एसी लावला जाणार नाही ही आधीच स्पष्ट केलेलं होतं ) संध्याकाळी सौ. नी विचारल्यावर उद्या discharge देतो असं डॉक्टरांनी सांगितलं. आम्ही खुश. मी ऑफिसला दांडी मारली आणि सकाळी हॉस्पिटल ला गेलो. दुपार झाली तरी डॉक्टरांचा पत्ताच नाही. तिथे काम करणाऱ्या कोणालाही डॉक्टर कुठे आहेत, कधी येणार याबद्दल काहीही कल्पना नव्हती . वाट बघून शेवटी फोन केला तेव्हा discharge बद्दल डॉक्टरांनी कानावर हात ठेवले. संध्याकाळी एकदाचे डॉक्टर आले. आम्ही विनंती केली आणि कसंबसं डॉक्टरांनी discharge द्यायचं मान्य केलं.
आता बिल............. बिल बघितलं आणि डोळे पांढरे व्हायची वेळ आली. करण्यासारखं काहीच नव्हतं.... बिल भरलं ........आभारप्रदर्शन आटोपलं आणि निघालो. विचार करता करता काही प्रश्न पडले.
१. जेमतेम १ महिना झाला हॉस्पिटल चालू होऊन तरी तिथे एवढे पेशंट कसे ? झाडून सगळ्या क्लिनिक्सना हेच हॉस्पिटल “बेस्ट” वाटू लागलंय का ?
२. स्पेशल रूममध्ये पेशंटला बाथरूम साठी ३ मोठ्या पायऱ्या चढाव्या लागतात. हॉस्पिटल
साठी हे असलं डीझाईन कोणत्या शाळेत शिकवतात ?
३. लिहून दिलेली औषधं आम्ही हॉस्पिटलच्या स्टोअर मधून घ्यायचो नाही. पण एक
गोळी कुठेच मिळत नव्हती ती घ्यायला तिथे गेलो. तिथल्या मुलीने बाकीची औषधं कुठून
घेतली त्याची चौकशी केली. “बाहेरून” म्हटल्यावर शोधायची थोडीही तसदी न घेता “ही गोळी नाही मिळणार “ सांगून हात झटकले. ह्याला
काय म्हणायचं ?
४. ज्या मजल्यावर हॉस्पिटल आहे त्या मजल्यावर अजूनही कोणतेही ऑफिस, हॉटेल
किंवा कोणताही व्यवसाय चालू झालेला नाही. कामे चालू आहेत. धूळ आणि प्रचंड आवाज
चालू असतो. दुसऱ्या मजल्यावर स्ट्रेचर वरचा पेशंट लिफ्ट मधून येउच शकत नाही मग हे
हॉस्पिटल घाई गडबडीने इथे चालू करायला परवानगी कशी मिळाली ?
आज हा लेख लिहीण्याचं कारण आता सांगतो .........सकाळी आईला आमच्याकडे घरकामाला येणाऱ्या बाईने तिला तिच्या आयुर्वेदिक डॉक्टर नी दिलेली चिठ्ठी दाखवली. बाईच्या मुलीला चप्पल चावलीये ( पायालाच ) आणि त्या साठी तिला नेमक्या “AM-PM 24 Hrs Hospital” मध्ये जायचा सल्ला दिला गेलाय ..........च्यायला काय नेटवर्क आहे. माझ्या ऑफिसमधल्या सेल्स टीम ला मी आता ह्या AM-PM 24 Hrs Hospital च्या मालकांकडे शिकायला पाठवणार आहे.
निघताना सासऱ्यांची जखम बघितली ........बिचारी लाजून स्वत:ची स्वतःच बरं
व्हायचं म्हणतेय.
मी केला गाढवपणा ......तुम्ही करू नका उपचार फुकट असतील तरी नको तिथले डॉक्टर अविनाश सोडले तर मुर्खांचा बाजार आहे .........लुटमार आहे.
मी केला गाढवपणा ......तुम्ही करू नका उपचार फुकट असतील तरी नको तिथले डॉक्टर अविनाश सोडले तर मुर्खांचा बाजार आहे .........लुटमार आहे.
मंगळवार, ४ मार्च, २०१४
"सौ नवनीत कौर राणा”
"सौ नवनीत कौर राणा”
नुकतीच राष्ट्रवादी कॉंग्रेसची लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर झाली आणि अमरावती साठी “सौ नवनीत कौर राणा” ह्या महिलेचं नाव बघून अनेकांच्या भुवया उंचावल्या. आजवर राजकारणाशी प्रत्यक्ष संबंध नसला तरी अपक्ष आमदार श्री रवी राणा यांच्या त्या पत्नी.
नवनीत कौर राणा यांच्याबद्दल जुजबी माहिती असलेले लोक लगेच कामाला लागले, आणि मग नवनीत यांचे जुने पाने फोटो फेसबुक आणि Whatsapp वर फिरू लागले. नवनीत यांना उमेदवारी मिळण्याचं खरं कारण मा. श्री शरद पवार साहेबच सांगू शकतील पण एक सामान्य नागरिक म्हणून विचार केल्यावर मला काही कारणं दिसतात ते अशी ...
1. मुळात आता सुशिक्षित वर्ग राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस ह्या दोन्ही पक्षांपासून दुरावत चाललाय. सुशिक्षित मतदारांप्रमाणेच सुशिक्षित उमेदवार मिळणंही त्यांना अवघड झालेलं असणार मग त्यातल्या त्यात १२वी शिकलेल्या नवनीत ताई दुसरी किंवा तिसरी शिकलेल्या उमेदवारांपेक्षा ग्रेटच.
2. वर्षानुवर्ष तेच तेच चेहेरे बघून लोक कंटाळतात. एक नवा आणि “बघणेबल” चेहेरा लोकांसमोर आणून एकूणच “राष्ट्रवादी कॉंग्रेस” बघणेबल व्हावी असं पवार साहेबांचं गणित असणार. निदान अशा बघणेबल चेहेऱ्याकडे बघून तरी जनता अजितदादा पवारांची “मुक्ताफळं”, सिंचन घोटाळा, आदर्श घोटाळा, भुजबळांची रोज उघडकीला येणारी नविन प्रकरणं हे सगळं विसरेल अशी साहेबांची खात्री असणार.
3. लोकसभेत आरडाओरडा करणारे, निरर्थक घोषणाबाजी करणारे खासदार जनतेचं पुरेसं मनोरंजन करू शकत नाहीत. पवार साहेबांनी आय.पी.एल वाल्यांची कल्पना वापरली असणार. आय.पी. एल मध्ये कसं क्रिकेटचा थरार वाढविण्यासाठी विकेट पडल्यावर किंवा चौकार षटकार मारल्यावर मनोरंजन असतं. नवनीतताईना लोकसभेत बसवून लोकसभेची शोभा वाढविण्याचा पवार साहेबांचा “उदात्त हेतू” असणार. त्या निमित्ताने लोकसभेचं “Live” प्रक्षेपण करणाऱ्या channels चं पण टी.आर.पी. वाढेल.
नवनीत ताईना उमेदवारी का दिली हे एक तर साहेब जाणोत आणि ताई जाणोत. मतदार काय गोविंदालाही निवडून देतात. तुम्हीही हा लेख केवळ त्यांचा फोटो बघून उत्सुकता वाढली म्हणूनच वाचलात की नाही ? त्या निवडून आल्याच तर डोक्यावर पदर घेऊन संसदेच्या पायऱ्या चढतानाचे त्यांचे फोटो पण असेच बघा आणि शेअर करा म्हणजे झालं.
एक
मनोरंजनोत्सुक ( “निखळ” मनोरंजनासाठी उत्सुक असलेला )
ता.क. – नवनीत ताईना उमेदवारी मिळाल्यापासून कु. राखी सावंत देखील निरनिराळ्या पक्षांच्या कार्यालयांचे उंबरठे झिजवत आहेत अशी बातमी आहे.
शनिवार, १ मार्च, २०१४
नाही म्हटलेलं, मला हल्ली चालतं
कशालाही नाही म्हटलेलं, मला हल्ली चालतं
नकारांची सवय लागलीये पण मौन सालं टोचतं
नकारांची सवय लागलीये पण मौन सालं टोचतं
पाठ असतात “सगळेच” पाढे, गणित नेमकं चुकतं
भविष्याचं भूत माझ्या “आज” चा गळा घोटतं
भविष्याचं भूत माझ्या “आज” चा गळा घोटतं
झेपत नाहीत माणसं फारशी, जंगलात मन रमतं
शांत निवांत तळ्यात एकटंच, पाय सोडून बसतं
शांत निवांत तळ्यात एकटंच, पाय सोडून बसतं
तिऱ्हाईतासारखं आरशात बघायला, हल्ली खूप आवडतं
रोज मरून हसत जगायला, मला छान जमतं
रोज मरून हसत जगायला, मला छान जमतं
बुधवार, २९ जानेवारी, २०१४
रविवार, १९ जानेवारी, २०१४
प्रति, श्री आर. आर. पाटील, गृहमंत्री – महाराष्ट्र राज्य
प्रति,
श्री आर. आर. पाटील
गृहमंत्री – महाराष्ट्र राज्य
साहेब,
नुकतीच तुम्ही मा. राजसाहेबांची संपत्ती जप्त करायची वल्गना केलीत आणि तुमचा “कर्तव्यकठोर बाणा” बघून तुमचा खूप अभिमान वाटला. अशा प्रकारची “धडाडीची” कारवाई तुम्ही सातत्याने करत आलात पण “नजरचुकीने” काही प्रकरणे तुमच्या नजरेतून सुटून गेली. त्या प्रकरणांची आठवण करून देण्यासाठी हा पत्रप्रपंच.
साहेब .......
१ ) काही वर्षांपूर्वी तुम्ही डान्स बार “बंद म्हणजे बंद” ची घोषणा केलीत पण दुर्दैवाने आजही तेवढेच डान्स बार तेवढ्याच दिमाखात चालू आहेत. अधून मधून वृत्तपत्रांमध्ये धाडी पडल्याच्या, काहींना अटक झाल्याच्या बातम्या येतात पण एवढं मात्र खरं की परिस्थिती “जैसे थे” आहे. तुमच्या अधिकारात असलेल्या पोलिस दलावर तुमचा वचक राहिला नाही की लोक म्हणतात त्याप्रमाणे खरंच तुम्हालाही ह्या धंद्यातून काही “मिठाई” पोचतेय म्हणून दुर्लक्ष करताय ?
२ ) ११ ऑगस्ट २०१२ रोजी आझाद मैदानात आणि सी.एस.टी. परिसरात थैमान घातलं गेलं. ५८ पोलीस जखमी झाले, ६० / ७० गाड्या फोडल्या गेल्या, पत्रकारांना मारहाण झाली आणि महिला पोलिसांशी देखील गैरवर्तन करण्यात आले. कोट्यावधींच्या सरकारी आणि खाजगी मालमत्तेचं नुकसान झालं. अमर जवान स्मारकाचं देखील नुकसान केलं गेलं. साहेब .........किती नुकसान भरपाई वसूल केलीत आजवर ?
३ ) मागच्या वर्षी सांगली महापालिकेची निवडणूक झाली. त्यापूर्वी सांगली आणि मिरजेत ज्यांच्यावर दंगल भडकविण्याचा आरोप होता त्या अज्जू पटेल, मैनुद्दीन बागवान सारख्या महाभागांना उमेदवारी देऊनच तुम्ही थांबला नाहीत तर चक्क त्यांच्यासाठी प्रचारसभा पण घेतलीत. त्यांच्याकडून किती नुकसान भरपाई वसूल केलीत ? नक्की काय संदेश देताय मतदारांना ?
४ ) तुमच्या जितेंद्र आव्हाडांकडून आजवर किती नुकसान भरपाई वसूल केलीत ? त्यांचं तर स्वतःच घर पण नाही महाराष्ट्रात कशी वसूल कराल नुकसान भरपाई ?
आदर्श घोटाळा असू दे किंवा हजारो कोटीचा सिंचन घोटाळा असू दे काही प्रकरणात सरकारी अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पण ठपका असलेल्या तुमच्या आणि तुमच्या मित्रपक्षातल्या नेत्यांचं काय वाकडं केलंत साहेब आजवर ?
कशाला उगाच सच्चेपणाचा आणि कर्तव्यकठोर वगैरे असल्याचा आव आणताय. ही असली “राज”कारणं तुम्हाला झेपणारी नाहीत.
परवा एकाशी बोलता बोलता सहज बोलून गेलो बघा पटतंय का ..........
“राजकारण करावं तर शरद पवारांनीच
बोलबच्चन तर काय आर. आर. पाटील पण आहेत”
आपला
एक बोलबच्चन
तुमच्याकडून “नजरचुकीने” काही घटना दुर्लक्षित झाल्या असाव्यात, कदाचित इथे दिलेल्या लिंक्स बघून तुम्हाला त्या कळतील
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)











