70 लाख लिटर पाण्याचा अपव्यय होतो म्हणून काही लोक आणि संस्था महाराष्ट्रात IPL च्या सामन्याना विरोध करताहेत. दबावाला बळी पडून सरकारने खरंच राज्यात IPL ला बंदी घातली तर त्यांच्यासारखे कर्मदरिद्री तेच.
महाराष्ट्रात एकूण लोकसंख्येपैकी किमान एक कोटी लोक फ्लॅटमध्ये राहतात ? एक व्यक्ति फ़क्त तीनदा घरातला "फ्लश" वापरते असं धरलं तरी किमान 15 कोटी लिटर पाणी फ्लश मध्ये वापरलं जातं असं म्हणता येईल ? नीट नियोजन केलं आणि दिवसाकाठी ह्यातलं फ़क्त 5% पाणी वाचवता आलं तरी वर्षभरात साधारण 250 कोटी लिटर पाणी वाचू शकेल ?
मुळात पाणी ही समस्या जेवढी मोठी आहे त्यापेक्षा मोठी समस्या आहे पाण्याचं Distribution. मराठवाड्यातला दुष्काळ आजचा नाही बंदी घालायाचीच तर ती तिथल्या राजकारण्यांवर आणि त्यांनी स्वार्थासाठी तिथे उभ्या केलेल्या साखर कारखान्यावर घालावी लागेल.
अनुराग ठाकुर म्हणाले ते खरं मानायचं तर 100 कोटींचा महसुल अपेक्षित आहे राज्याला IPL मधून. सामन्याना विरोध करणाऱ्या लोकांनी खरं तर हा निधी दुष्काळग्रस्त भागासाठी वापरण्यासाठी सरकारवर दबाव आणावा...... किमान 50 खेड़ी सहज कायमची दुष्काळमुक्त होतील एवढ्या पैशात.
"काही लाख लिटर पाण्यासाठी एवढ्या महासुलावर पाणी सोडण्यात काय अर्थ आहे ?"
FYI - मी क्रिकेटप्रेमी वगैरे अजिबात नाही. गेल्या 5 वर्षात दोनदा "लगान" बघितला आहे ते धरून एकूण पावणे चार सामने बघितले आहेत मी. ढोणी आणि विराट कोहली ( तो पण अनुष्काचा BF म्हणून) एवढे दोनच खेळाडू माहीत आहेत मला आताच्या संघातले










