रविवार, २२ नोव्हेंबर, २०१५

मी पुरस्कार परत करणार.....



निषेध - पुरस्कार परत करणार.....

काल एक किलो तुरडाळ आणायला बायकोने वाण्याकड़े पिटाळलं ...... रुबाबात शंभराची नोट काढून वाण्याला दिली आणि एक किलो तुरडाळ मागितली.

माझ्याकड़े दयाभावाने बघत वाण्याने सांगितलं "इतने में तो आधा किलो आयेगा"
मी म्हटलं "अरे बाबा राज्य सरकारने तसं जाहिर केलंय"
"तो जाके सरकारसे ले लो" असं म्हणून तो दुसऱ्या customer कड़े वळला
त्या वाण्याने आणि पर्यायाने सरकारने एका मराठी मध्यमवर्गीय माणसाला दाखवलेली "असहिष्णुता" बघुन माझ्यातला "सहिष्णु" माणूस जागा झालेला आहे.

साहित्यिक नसलो म्हणून काय झालं मलाही पुरस्कार मिळालेला आहे. त्या वाण्याचा आणि पर्यायाने सरकारचा निषेध म्हणून तो पुरस्कार मी परत करायचं ठरवलं आहे.

१९८३ साली ओक बाग़ गणेशोत्सव मंडळातर्फे घेण्यात आलेल्या चमचा लिम्बु शर्यतीत भाग घेतल्याबद्दल मिळालेला हा पुरस्कार मी परत करतो आहे. राज्य सरकारने आपला प्रतिनिधी पाठवून तो घेऊन जावा.

टीप - पुरस्कार म्हणून मिळालेली ही ताटली आम्ही गेली 32 वर्ष वापरली असली तरी मी स्वतः ती घासुन ठेवलेली आहे.

मंगळवार, १७ नोव्हेंबर, २०१५

संजय भंसाळीचा "बाजीराव मस्तानी"

























संजय भंसाळीचा "बाजीराव मस्तानी" येतोय. काल त्यातलं एक गाणं whatsapp वर पाठवलं कोणी तरी ....... चक्क बाजीरावांच्या पत्नी काशीबाई, मस्तानी बरोबर नाचताना दाखवल्या आहेत.


सिनेमा म्हटल्यावर थोडाफार मसाला घालावा लागतो वगैरे ठीक आहे पण इतका ? पैसे कमवण्यासाठी इतिहासाची इतकी मोडतोड़ ?

आधीच थोर ब्राह्मणद्वेष्टया इतिहासकारांनी बाजीराव ही व्यक्तीरेखा कधी "मस्तानी" पासून वेगळी करुन एक अपराजित सेनानी म्हणून मांडलीच नाही त्यात आता ह्या गल्लाभरु सिनेमाची भर.

गुरुवार, १२ नोव्हेंबर, २०१५

असहिष्णुता ?

आमिर खानचा नविन सिनेमा येतोय का ?

मागे एकदा कुठल्या तरी सिनेमाच्या रिलीजच्या तोंडावर नर्मदा बचाओ आंदोलनात जाउन मेधाताईंच्या बाजूला बसलेला 

ते प्रकल्पग्रस्त बुड़ले धरणात की जीवंत आहेत हे माहितेय का त्याला ?

त्या कमाल खानचं समजु शकतो .....पण फुक्कट पब्लिसिटी मिळवायला आमिर खानला पण असले धंदे करावे लागतात का ?

शनिवार, ७ नोव्हेंबर, २०१५

बिहार विधानसभेचे निकाल

बिहार विधानसभेचे निकाल यायला सुरुवात झाली तसे भाजपचे सोशल मीडियावरचे विद्वान वाचाळवीर भलतेच कार्यरत झाले.
"दिल्लीत सुशीक्षीतांनी आप ला निवडून आणले मग पाणीपूरीवाल्यांकडून काय अपेक्षा ठेवणार" अशा आशयाची बेताल वक्तव्य भाजप कार्यकर्त्यांच्या फेसबुक वॉल वर झळकायला लागली.

खरं तर "पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्राला फसवणं सोपं होतं पण पाणीपुरीवाल्यांना फसवणं भाजपला अवघड गेलं" असंही म्हणता येईल की.

दीड वर्षापूर्वी मिळालेला विजय भाजपला अजुन पचवता आलेला नाही त्यात हा असा पराभव कुठून पचणार ?

उन्माद ....पक्षाच्या विरोधातले ते सगळे मुर्खच ही भूमिका ....वाचाळवीरता ...... हे सगळे गुण भाजपच्या पक्षशिस्तीचा भाग झालेत का ?

शुक्रवार, ६ नोव्हेंबर, २०१५

ऑफिस मध्ये "कांड"


आमच्या ऑफिस मध्ये रोज काही तरी "कांड" चालू असतात ..........

मलाही सोडत नाही कोणी ......आज माझ्या केबिनच्या बाहेर, माझ्या नावाच्या पाटीखाली हा उपद्व्याप करून ठेवलाय कोणी तरी .......

मला कल्पना आहे तशी हे डोकं कोणाचं असणार त्याची ....

........इन ऑफिसवालो से मुझे बचाओ........