रविवार, २२ नोव्हेंबर, २०१५

मी पुरस्कार परत करणार.....



निषेध - पुरस्कार परत करणार.....

काल एक किलो तुरडाळ आणायला बायकोने वाण्याकड़े पिटाळलं ...... रुबाबात शंभराची नोट काढून वाण्याला दिली आणि एक किलो तुरडाळ मागितली.

माझ्याकड़े दयाभावाने बघत वाण्याने सांगितलं "इतने में तो आधा किलो आयेगा"
मी म्हटलं "अरे बाबा राज्य सरकारने तसं जाहिर केलंय"
"तो जाके सरकारसे ले लो" असं म्हणून तो दुसऱ्या customer कड़े वळला
त्या वाण्याने आणि पर्यायाने सरकारने एका मराठी मध्यमवर्गीय माणसाला दाखवलेली "असहिष्णुता" बघुन माझ्यातला "सहिष्णु" माणूस जागा झालेला आहे.

साहित्यिक नसलो म्हणून काय झालं मलाही पुरस्कार मिळालेला आहे. त्या वाण्याचा आणि पर्यायाने सरकारचा निषेध म्हणून तो पुरस्कार मी परत करायचं ठरवलं आहे.

१९८३ साली ओक बाग़ गणेशोत्सव मंडळातर्फे घेण्यात आलेल्या चमचा लिम्बु शर्यतीत भाग घेतल्याबद्दल मिळालेला हा पुरस्कार मी परत करतो आहे. राज्य सरकारने आपला प्रतिनिधी पाठवून तो घेऊन जावा.

टीप - पुरस्कार म्हणून मिळालेली ही ताटली आम्ही गेली 32 वर्ष वापरली असली तरी मी स्वतः ती घासुन ठेवलेली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: