रविवार, ३ एप्रिल, २०१६

“देऊळ बंद”



मगाशी झी सिनेमावर “देऊळ बंद” सिनेमा बघत होतो .......छान आहे सिनेमा म्हणून ........मोहन जोशीचं काम तर अप्रतिमच आहे. बाकी काही फारसं मला पटलं नाही पण “सध्या” त्यावर बोलून लगेच ज्वलंत, धर्माभिमानी, धर्मरक्षक लोकांच्या भावना वगैरे खाजवायच्या नाहीयेत.

ह्या सिनेमातलं मला एक कळलं नाही .......स्वामी आधी म्हणतात की “देव जन्म आणि मृत्यूत ढवळाढवळ करू शकत नाही” आणि सिनेमाच्या शेवटी राघववर झाडलेली गोळी स्वतःवर घेतात ......रक्त सांडत सांडत जातात ....... राघवचा जीव वाचवतात .........असं कसं ?

Cinematic Liberty वगैरे थोडंफार मला मान्य आहे पण ही केवळ निर्मात्याच्या किंवा लेखकाच्या Logic मधली चूक आहे की देवाचं महात्म्य ज्यांना कळतं (असं त्यांचं म्हणणं आहे) त्यांच्याही डोक्यात असं काहे confusion आहे?

जाऊ दे मला काय ह्यातलं फारसं कळत नाही तसंही  मी “छोटा भीम” बघणंच जास्त चांगलं..............


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: