रविवार, २४ एप्रिल, २०१६

आज जरा जास्त झालेली आहे


एखादी व्यक्ती किती हलकट आहे ..........किती नीच आहे हे जगात फक्त तुम्हालाच माहित आहे असं वाटायला लागतं किंवा सगळ्यांना सगळं खूप Easily मिळालंय आणि तुम्हालाच तेवढं खूप जास्त struggle वगैरे करावं लागलंय असं वाटायला लागतं तेव्हा समजून जा ..................
.
.
.
आज जरा जास्त झालेली आहे ............हरामखोर मित्रांच्या “One for the Road” च्या आग्रहाला बळी न पडता ............ दोन पायांनी चालता येतंय तोवर नीट घरी निघा ............आणि घरी गेल्यावर तोंड बंदच ठेवा.......अगदी बायकोवर तुमचं किती प्रेम आहे ते पण सकाळी उठल्यावरच सांगा ............. नाही तर.......... त्यापुढे जे काय “struggle” करावं लागेल ते कुणाला सांगता पण नाही येणार आयुष्यभर .........

मंगळवार, १९ एप्रिल, २०१६

आता Next नंबर तुझाच

कुठल्याही लग्नात ......... नवऱ्या मुलाच्या किंवा मुलीच्या धाकट्या भावंडाना मोठी माणसं चिडवत असतात .............आता Next नंबर तुझाच हां...............

आयला एखाद्या पोराची नाही तर पोरीची सटकली आणि मयताला गेलेले असताना तो किंवा ती ..........सगळ्यांना तसंच म्हणाला तर चालेल का ?????

सोमवार, १८ एप्रिल, २०१६

“ट्रेन मे बाथरूम को कडी लगाने को भूलनेवाले............”


टिळक चौक, पारनाका हे भाग म्हणजे आमच्या कल्याणातले “सदाशिवपेठ” मानले जातात. ह्या भागाबद्दल एक दंतकथा सांगितली जाते. देव म्हणे अक्कल वाटायला निघाला तेव्हा त्याने पारनाक्यापासून सुरुवात केली. गांधी चौक कासारहाट उरकून टिळक चौकात अक्कल वाटल्यावर देवाकडची अक्कल संपली .........त्यामुळे बाकीचं कल्याण “तसंच” राहिलं.
.
ह्या अशा विद्वत्तापूर्ण वातावरणात आमचा एक मित्रही जन्माला आला...........आजच्यापुरतं तात्या म्हणू त्याला आपण. साधारण १९ / २० वर्षांपूर्वी आम्ही ८ /१० मित्र केरळला एका मित्राच्या लग्नाला निघालेलो. आम्ही सगळे तसे समवयस्क म्हणजे विशी बावीशीतले एकदम गब्रू जवान वगैरे. कल्याणला रेल्वेच्या डब्यात शिरल्या शिरल्या प्रत्येकाने नीट Scanning करून झालं.
.
संपूर्ण डब्यात............जरा गारवा वाटेल अशी ......... मोजून एकच “हिरवळ” ...........मग प्रत्येक वेळी जाता येताना ............”जरा हसली काय रे ?”............ “आयला बघत पण नाय जाम आखडू दिसतेय रे”............ “आईशप्पथ कौन सी चक्की का आटा खाती होगी याsssssर” ............”अशी पोरगी पटली तर आपण तर सिगरेट, गुटखा दारू बिरू असल्या गोष्टींना हात पण नाय लावणार” अशा “विधायक” गप्पा चालू झाल्या.
.
आमच्या मित्राला म्हणजे तात्याला मात्र हे सगळं अजिबात मान्य नव्हतं ........म्हणजे त्या हिरवळीचं “असाध्य” असणं पटतच नव्हतं त्याला. “अरे अशा पोरी उलट पटवायला एकदम सोप्प्या असतात” ह्या त्याच्या म्हणण्यावर आमचा तात्या ठाम होता. दरम्यान जेवायची वेळ झाली. बाहेरचं खायला नको म्हणून प्रत्येकाने काही तरी करून आणायचं ठरलेलं. तात्या त्याच्या घरून तिखट मिठाच्या पुऱ्या आणणार होता. सगळ्यांनी डबे उघडले ........... तात्याने पण डबा उघडला ...........पुऱ्याच होत्या पण शेवपुरीसाठी वापरतात तसल्या पुऱ्या...............बोंबला च्यायला आता ट्रेन कुठे थांबणार ? तिथे काय मिळणार ? कारण रात्रीचे ११ वाजलेले. जाम वैतागले सगळे ............पण तात्या ठाम होता ........मी ह्याच पुऱ्या आणतो सांगितलेलं............कसं बसं काही तरी पोटात ढकललं आणि आडवे झालो. पुन्हा हिरवळीचाच विषय चालू............तात्याचं .......”मनात आणलं तर दोन तासात पटवू शकतो ............ती कधीची मला स्माईल देतेय” वगैरे............विद्वत्ताप्रचुर प्रवचन ऐकत एकेकाला झोप लागली
.
सकाळी जसजसे उठलो तसतसे “हलके” होऊन .........ब्रश वगैरे करून पुन्हा एक डोळा “हिरवळीवर” ठेऊन पत्ते, गप्पा चालू झाल्या. तात्यासाहेब उठले आणि बाथरूम मध्ये गेले.......... २ मित्र बाथरूम जवळच्या दारात उभे राहून हवा खात होते .............खरं तर तिथून “हिरवळ” जवळून बघता येत होती म्हणून त्यांना हवा खायची होती.
.
नेमकी तेव्हाच “हिरवळ” उठली आणि घाईघाईने........... आमचे तात्यासाहेब गेलेले त्याच बाथरूमकडे वळली ............. दरवाजातले मित्र काही बोलणार तोवर हिरवळ ........दरवाजा उघडून आत ...........तात्या खाडकन उठून उभाच राहिला ..........
.
ज्या वेगाने ती बाथरूमकडे गेलेली त्याच्या चौपट वेगाने ती जागेवर परत गेली..........तिची काय चूक? .......... रेल्वेतल्या बाथरूमला दोन कड्या असतात एक जी आतून आणि बाहेरून दोन्हीकडून लावता येते ...........आणि दुसरी फक्त आतून लावता येते ती. तात्यासाहेबांनी एकच कडी लावली ती नेमकी बाहेरून उघडणारी .............१० मिनिटांनी मान खाली घालून तात्या आला ........त्या क्षणापासून तात्याचा जो काय band वाजवला सगळ्यांनी. पुढचे ६ दिवस तोंड पण नाही उघडलं तात्याने.
.
मधे बरीच वर्ष गेली तात्या परदेशात पण जाऊन आला नोकरीच्या निमित्ताने. एकदा ट्रेन्सचा प्रॉब्लेम होता खूप. एक एक करत पुन्हा मित्र भेटत गेले. platform वर एक गाडी उभी होती पण खच्चून भरलेली. नेमका आम्हाला तात्या दिसला. काय कसं काय वगैरे गप्पा चालू असताना एका मित्राने तात्याला विचारलं “काय तात्या परदेशात जाऊन आलास ...........मग जीवाची मुंबई केलीस की नाही ............पोरी एकदम free minded असतात ना रे तिकडे ? तात्याची कळी खुलली .........”अरे मग एकदम मज्जा असते तिकडे .........आपण तर फुल्ल्ल टू मज्जा केली” तात्याने त्याचं वाक्य संपवायच्या आत ..........शक्य तेवढा भाबडा चेहेरा करून एकदम प्रेमाने दुसऱ्या मित्राने तात्याला प्रश्न केला
.
.
...........तेव्हा तरी कडी नीट लावलेलीस ना रे ?
.
पेटलेला तात्या ......... .......वेडात मराठे वीर दौडले सात सारख्या आवेशाने .....समोरच्या खच्चून भरलेल्या लोकलमध्ये जीव तोडून घुसला .........लोकल निघून गेली ...........बरीच वर्ष झाली तात्या दिसला नाही ........बहुतेक आम्हाला बघून तात्या रस्ता बदलत असणार
म्हणून म्हणतो ................
.
“ट्रेन मे बाथरूम को कडी लगाने को भूलनेवाले............जगाला अक्कल सिखाया नहीं करते”

सोमवार, ११ एप्रिल, २०१६

IPL ला विरोध कशासाठी ?

70 लाख लिटर पाण्याचा अपव्यय होतो म्हणून काही लोक आणि संस्था महाराष्ट्रात IPL च्या सामन्याना विरोध करताहेत. दबावाला बळी पडून सरकारने खरंच राज्यात IPL ला बंदी घातली तर त्यांच्यासारखे कर्मदरिद्री तेच.

महाराष्ट्रात एकूण लोकसंख्येपैकी किमान एक कोटी लोक फ्लॅटमध्ये राहतात ? एक व्यक्ति फ़क्त तीनदा घरातला "फ्लश" वापरते असं धरलं तरी किमान 15 कोटी लिटर पाणी फ्लश मध्ये वापरलं जातं असं म्हणता येईल ? नीट नियोजन केलं आणि  दिवसाकाठी ह्यातलं फ़क्त 5% पाणी वाचवता आलं तरी वर्षभरात साधारण 250 कोटी लिटर पाणी वाचू शकेल ?

मुळात पाणी ही समस्या जेवढी मोठी आहे त्यापेक्षा मोठी समस्या आहे पाण्याचं Distribution. मराठवाड्यातला दुष्काळ आजचा नाही बंदी घालायाचीच तर ती तिथल्या राजकारण्यांवर आणि त्यांनी स्वार्थासाठी तिथे उभ्या केलेल्या साखर कारखान्यावर घालावी लागेल.

अनुराग ठाकुर म्हणाले ते खरं मानायचं तर 100 कोटींचा महसुल अपेक्षित आहे राज्याला IPL मधून. सामन्याना विरोध करणाऱ्या लोकांनी खरं तर हा निधी दुष्काळग्रस्त भागासाठी वापरण्यासाठी सरकारवर दबाव आणावा...... किमान 50 खेड़ी सहज कायमची दुष्काळमुक्त होतील एवढ्या पैशात.

"काही लाख लिटर पाण्यासाठी एवढ्या महासुलावर पाणी सोडण्यात काय अर्थ आहे ?"

FYI -  मी क्रिकेटप्रेमी वगैरे अजिबात नाही. गेल्या 5 वर्षात दोनदा "लगान" बघितला आहे ते धरून एकूण पावणे चार सामने बघितले आहेत मी. ढोणी आणि विराट कोहली ( तो पण अनुष्काचा BF म्हणून) एवढे दोनच खेळाडू माहीत आहेत मला आताच्या संघातले