लेखक - संदीप वासलेकर
संदीप वासलेकरांनी मांडलेले मुद्दे, दीलेली आकडेवारी थक्क करणारी आहे. भारत एक आर्थिक महासत्ता बनण्याच्या मार्गावर आहे असं एक चित्र सातत्याने आपल्यासमोर उभं केलं जातं. ऐकायला कितीही गोड वाटलं तरी अर्थिक महासत्त्ता वगैरे बनणं म्हणजे हे पोकळ स्वप्नच आहे ही वस्तुस्थिती वासलेकरांच्या ह्या पुस्तकातुन समोर येते.
सरकार किंवा वित्तीय
संस्थांकडुन जी आकडेवारे दिली जाते त्या पेक्षा न दीलेली आकडेवारी बरीच मोठी असते. अर्थिक ताकदीत जरी भारत पहिल्या पाच दहा देशांमधे
असला तरी एकुण नागरी सुविधा, आरोग्य, शिक्षण अशा इतर मह्त्त्वाचे
निष्कर्ष लावले तर मात्र आपण पहिल्या शंभरात पण नसु.
नुसती आकडेवारी मांडुन, निष्कर्ष काढुन
वासलेकर थांबत नाहीत तर त्यांनी मार्गही सुचवलेत.
अभ्यासण्यासारखं पुस्तक.



